August 27, 2024 1:41 PM

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. राज्यात सध्या ४७१ मदत केंद्र सुरू असून त्यात सुमारे ७० हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. या पुरामुळे त्रिपुरातले रस्ते पूल यांचं नुकसान झालं असून त्रिपुरा राज्य सरकारनं हे नुकसान १ हजार ८२५ कोटी रुपये इतकं असल्याची माहिती दिली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध सामाजिक आणि खासगी संस्था, डॉक्टर्स तसंच सामान्य लोकांनीही मदत कार्यासाठी देणगी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिपुरा रा...

August 25, 2024 7:42 PM

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. पूरामुळे जास्त प्रभावित झालेल्या दक्षिण त्रिपुरा आणि सेपाहिजाला जिल्ह्यांमध्ये अजूनही बचावकार्य सुरु आहे. भूप्रदेशाची माहिती नसल्यामुळे, अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान एनडीआरएफ समोर आहे. गोमती आणि रुद्रसागर तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सेपाहिजाला जिल्ह्यातल्या बटाली आणि घारांतली गावात लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

August 22, 2024 1:29 PM

त्रिपुरातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती, आजही मुसळधार पावसाचा इशारा

त्रिपुरात सतत होणाऱ्या पावसामुळं राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरल्या पिकांची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.    मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी आगरतळा इथल्या पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

August 20, 2024 7:53 PM

त्रिपुरा : भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमधे ७ जणांचा मृत्यू

त्रिपुरामधे मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलन  आणि महापुराच्या घटनांमधे किमान सात नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. संततधार पावसामुळं तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला  अतिसखल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं या नद्यांकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे.  आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी त्रिपुरा राज्य सरकारनं राज्यभरात १८३ निवारा छावण्या उभारल्या असून तिथली जिल्हा प्रशासनं पुरग्रस्त नागरिकांना अहोरात्र म...