August 9, 2024 8:07 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं. गेल्या महिन्यात २२ तारखेला सुरु झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं. लोकसभेत या अधिवेशन काळात १५ बैठका झाल्या, ११५ तास कामकाज झालं, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर २७ तास १९ मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन १२ विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी वित्त विधेयक, विनियोजन ...

July 26, 2024 1:35 PM

संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला.   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळं झालेल्या गदारोळामुळं लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झालं होतं. सध्या लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

July 19, 2024 1:44 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लोकसभा सचिवालयानं काल या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली.     येत्या २२ जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सु...

July 1, 2024 1:53 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभारप्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकुर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या लोककल्याणकारी योजनांचं आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा उल्लेख केला. भाजपा सरकारच्या काळात २५ कोटी लोकसंख्या गरिबीतून वर आली, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं गेलं असं ते म्हणाले.   संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर त्यांनी टीका केली. तत...