August 12, 2024 3:18 PM

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्यासाठी पाठिंबा – शरद पवार

महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याविषयी सुचवलं, असं पवार म्हणाले...

August 6, 2024 7:20 PM

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा – नाना पटोले

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोडवावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.  आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपानं मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली जात आहे. आरक्षणाचा निर्णय सत्तेत बसलेल्या लोकांना घ्यायचा असताना विरोधी पक्षांनाच ते त्याबद्दल विचारत आहेत. वास्तविक हे काम केंद्र सरकारचं असून त्यांनीच हा निर्णय घ्यावा असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

July 30, 2024 7:25 PM

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले. धारावीतल्या रहिवाशांना ...

July 17, 2024 8:20 PM

पोलीस आणि इतर विभागातल्या काही पदांवर थेट भर्तीत अग्निवीरांना १० % समांतर आरक्षण, हरयाणा सरकारची घोषणा

पोलीस, खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांवर थेट भर्ती करताना, हरयाणा सरकार अग्निवीरांना १० टक्के समांतर आरक्षण देणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज चंदीगढ इथे वार्ताहरांशी बोलताना ही घोषणा केली. हरयाणातल्या पोलिस हवालदार, खाण रक्षक, वनरक्षक, कारागृह अधीक्षक आणि विशेष पोलिस अधिकारी, या पदांचा यात समावेश आहे, असं ते म्हणाले.   ड गटात भर्ती करताना, अग्निवीरांना वयात ३ वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल, असंही त्यांनी सांगितलं. अग्निवीरांना गट...

July 12, 2024 12:18 PM

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत १० टक्के आरक्षण

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल या केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे. माजी अग्निवीरांना वयोमर्यादेच्या अटीमध्ये देखील सवलत मिळेल, तसंच त्यांच्यासाठी कोणतीही शारीरिक क्षमता चाचणी होणार नाही. या निर्णयाद्वारे गृह मंत्रालयांनं एक मोठं पाऊल उचललं आहे, असं केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या महासंचालक नीना सिंग यां...

June 20, 2024 6:53 PM

बिहारमधलं वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

बिहार सरकारनं मागास, अति मागास, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधे लागू केलेलं वाढीव आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं हे आरक्षण ६५ टक्क्यापर्यंत वाढवलं होतं. हे आरक्षण लागू करणाऱ्या बिहार आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरचा निकाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीं के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती हरिश कुमार यांच्या ख...