September 5, 2024 6:42 PM

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन लक्ष्मणराव जाधव यांच्यासह केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू, भाजपा नेते मनन कुमार मिश्रा आणि ममता मोहंता तसंच राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांचा यामध्ये समावेश होता.              

August 20, 2024 7:07 PM

भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामध्ये किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, ओदिशामधून ममता मोहंता, राजस्थान सरदारर रवनीत सिंह बिट्टु आणि त्रिपुरामधून राजीब भट्टाचार्जी यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.  

August 8, 2024 11:13 AM

राज्यसभेच्या १२ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबरला मतदान

देशातल्या 9 राज्यांतल्या 12 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. राज्यातल्या 2 जागांचा यात समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी या महिन्याच्या 14 तारखेला अधिसूचना जारी होईल. 22 तारखेला अर्जांची छाननी होईल. 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे. राज्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे    

August 6, 2024 3:03 PM

‘देशात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आली’

सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णूता धोरण अमलात आणत असल्याचं त्यांनी सांगितलं.

July 26, 2024 8:23 PM

राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

राज्यसभेचं कामकाज आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ वरच्या चर्चेनं सुरु झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केवळ अल्पकालीन लोनानुनयी निर्णय घेतले नसून मध्यम आणि दीर्घकालीन विचारांवर काम केल्याचं वायएसआरसीपीचे एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. तर, हा अर्थसंकल्प लोकविरोधी आणि संघराज्य विरोधी असल्याचा आरोप सीपीआयचे सदस्य पी संतोष कुमार यांनी केला. राजदचे ए डी सिंह यांनी देशातल्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला, आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे योग्य लक्ष पुरवण्यात आलं नसल...

July 25, 2024 8:18 PM

राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शेतकरी, गरीब आणि बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसून, सरकार अन्नधान्यावर पुरेसं किमान आधारभूत मूल्य देत नसल्याचं ते म्हणाले.   सरकारनं या अर्थसंकल्पातून समाजाच्या कोणत्याही घटकाचं समाधान केलं नसल्याची टीका ‘आप’ चे राघव चड्डा यांनी केला. सामान्य माणसावरचा कराचा बोजा वाढला असून ग्रामीण भागातली उत्पन्नाची वाढ दशकभरात सर्वात नीचांक...