August 9, 2024 3:54 PM

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

August 7, 2024 8:18 PM

१०,००० रेल्वे इंजिनांवर कवच बसवायला केंद्र सरकारची मंजुरी

दहा हजार रेल्वे इंजिनांवर कवच बसवायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ‘कवच’ मुळे ट्रेनचा वेग नियंत्रित होणार असून अपघात रोखण्यासाठी आवश्यकता असेल तिथे ब्रेक लावणं शक्य होणार आहे. पुढल्या दोन वर्षात कवच लावण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. देशभरात कवच बसवण्याचं काम वेगात सुरू असून

July 23, 2024 8:20 PM

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वेच्या एकूण अर्थसंकल्पातल्या १ लाख ८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची तरतूद सुरक्षे संबंधित कामांसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचं त्यांनी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

July 3, 2024 9:21 AM

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावे, यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.