August 4, 2024 10:09 AM
देशातील अन्नधान्य विविधता जगासाठी आशेचा किरण असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास, बत्तिसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचा नवी दिल्लीत आरंभ
भारतात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असून, जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. यावर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन’ अशी आहे. सरकार कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी विविध सुधारणा आणि उपाययोजना करत असून, शेतकऱ...