September 22, 2024 3:54 PM

सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा प्राधान्यक्रम – प्रधानमंत्री

मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद - प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे, आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेत डेलावेर इथं झालेल्या क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सध्या जग तणाव आणि संघर्षानं वेढलेलं असताना ही परिषद होत आहे, अशावेळी क्वाड सदस्य देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्वाचं असल्याचं ते...

September 19, 2024 6:12 PM

काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवादाची भीती न बाळगता मतदान झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीर मध्ये सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू असून पहिल्यांदाच दहशतवादाची भिती न बाळगता मतदान झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज श्रीनगरमधल्या प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्रशासीत प्रदेशात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जम्मू काश्मीरची जनता देशाच्या लोकशाहीला बळकट करत आहे, असंही ते म्हणाले.     प्रधानमंत्री संध्याकाळी कतरा आणि ...

September 17, 2024 2:09 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात ‘सुभद्रा’ योजनेचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात भुवनेश्वर इथं ओदिशा राज्य सरकारच्या ‘सुभद्रा’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या २१ ते ६० वयोगटातल्या पात्र लाभार्थी महिलांना, पाच वर्षांत ५० हजाराचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. या अंतर्गत वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये १० हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १० लाखापेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा केला जाईल, तसंच ते लाभार्थी महिलांशीही संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्र...

September 16, 2024 1:26 PM

प्रधानमंत्री आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.   तसंच दुर्ग ते विशाखापट्टणम आणि आग्रा छावणी ते वाराणसी या वंदे भारत रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्री आज हिरवा झेंडा दाखवतील. महाराष्ट्रात पुणे-हुबळी आणि कोल्हापूर - पुणे या दोन्ही गाड्या प्रत्येकी तीन दिवस चालणार आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग ते विशाखापट्टणम ही गाडी गुरुवार वगळता आ...

September 4, 2024 1:17 PM

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून खेळाडूंचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केलं आहे.  या खेळाडूंची  कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याची आकांक्षा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देईल, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना भारताला य...

August 30, 2024 1:39 PM

वाढवण इथं उभारण्यात येणाऱ्या खोल पाण्यातल्या सर्वात मोठ्या बंदराचं आज प्रधानमंत्री करणार भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.   पालघरमधे उभारण्यात येणारं वाढवण बंदर देशाच्या विकासात भरीव योगदान देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...

August 17, 2024 8:24 PM

जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अनिश्चितता, भूराजकीय युद्ध, रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेच्या शिखर बैठकीत ते बोलत होते. दूरस्थ पद्धतीनं ही बैठक झाली. वातावरण बदल, आरोग्य, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेचा सामना या देशांना करावा लागतो आहे. दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद हे देखील समाजाला धोकादायक असल्याचं ते म्हणाले.  व्यापार आणि दळणवळणाला प्रोत्साहन, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांचा; ‘विकास प्रक्रीयेत’ वाढता सहभाग या...

August 5, 2024 8:05 PM

विविध पिकांचे दीड हजार पर्यावरणस्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील

विविध पिकांचे दीड हजार पर्यावरण स्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा १०९ वाणांचं लोकार्पण लौकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या ५ वर्षात देशभरात शंभर फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरता १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं ते म्हणाले. शेती फायद्याची करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे असं सांगून,...

August 5, 2024 7:40 PM

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातली आत्मनिर्भरता महत्वाची असल्यातं ते म्हणाले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या समाज माध्यमावरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे. २०२०- २१ मध्ये गॅसचे उत्पादन सुमारे २८ अब्ज ७० कोटी घनमीटर होतं. जे २०२३-२४ मध्ये वाढून सुमारे अब्ज ४३ कोटी घनमीटर झालं आहे. २०२६ पर्यंत देशात गॅसचं उत्पादन ४५ अब्ज ३ कोटी घनमीटर पर्...

August 3, 2024 8:12 PM

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचे प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे, सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र आहे, असं ते म्हणाले. तृणधान्यं, दूध, डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात ...