August 6, 2024 7:20 PM

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा – नाना पटोले

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोडवावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.  आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपानं मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली जात आहे. आरक्षणाचा निर्णय सत्तेत बसलेल्या लोकांना घ्यायचा असताना विरोधी पक्षांनाच ते त्याबद्दल विचारत आहेत. वास्तविक हे काम केंद्र सरकारचं असून त्यांनीच हा निर्णय घ्यावा असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

July 30, 2024 8:06 PM

विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलत होते.   विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, राज्यात परिवर्तन व्हावं ही जनतेची भावना आहे. त्यामुळे आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे, असं ते म्हणाले.

July 25, 2024 3:20 PM

भाजपा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचं काम करतंय – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपाचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचं काम करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना केली. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या काही ऑडिओ, व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई करावी, निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करू नयेत, असंही ते म्हणाले.

July 23, 2024 6:40 PM

तरुणांना इंटर्नशिपची संधी म्हणजे काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमीभावासंबधी तरतूद नाही, शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी कमी करण्याबाबत, शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीबाबत तसंच मनरेगाबाबतही काही उल्लेख नाही याकडे लक्ष वेधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची दिलेली संधी म्हणजे काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल असल्याचं सांगत अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीबाबत ठोस धोरण नाही असं पटोले म्हणाले.

July 14, 2024 12:37 PM

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारणाऱ्या आमदारांवर कारवाईचा काँग्रेसचा इशारा

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्या पक्षातल्या आमदारांवर कारवाईचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.   विधान परिषदेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीपासूनच संबंधितांवर लक्ष होतं, आता त्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा पटोले यांनी, ट्विटरवर जारी एका चित्रफीतीतून दिला आहे.

July 11, 2024 7:33 PM

समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भ्रष्टाचारामुळे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या आहेत,  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विधीमंडळ परिसरात आज  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असून सुद्धा  मराठा आणि धनगर आरक्षणाच्या  मुद्द्यावर सत्ताधारी पक्षानं काल सदनात गोंधळ केला.  त्या गोंधळात पुरवणी मागण्या मान्य  करुन सरकारने लोकशाहीचा खून केला आहे अशी टीकाही पटोले यांनी केली.

July 5, 2024 7:46 PM

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं – काँग्रेस नेते नाना पटोले

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं तोवर सध्या ऐन पावसाळ्यात फेरिवाल्यांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला. पण तेव्हापासून गेल्या १० वर्षात राज्यातल्या फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळालेलं नाही असं नाना पटोले म्हणाले.   तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकार एकीकडे फेरीवाल्यांना १० हजार ...

June 24, 2024 6:35 PM

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं – नाना पटोले

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. तेलंगणात काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट २ लाख रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. त्याप्रमाणे येत्या २७ तारखेला सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा करावी, असं ते म्हणाले.    विविध राज्यांमधे दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, पण महाराष्ट्रात फक्त २७ रुप...