September 22, 2024 1:49 PM

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी बायडेन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतल्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या नव नव्या संधींवर चर्चा केली. ही चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून सांगितलं. जपानचे प्रधानमंत्री फुमियो कीशीदा आणि ऑस्ट्रेलियाचे ...

September 17, 2024 11:14 AM

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात शंभर दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि निर्णय घेण्यात आले आहेत, आणि विकसीत Bharat@2047 यांचा भक्कम पायाभरणी केली आहे.  

September 1, 2024 1:24 PM

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष, उत्तम कामगिरी, सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्य...

August 5, 2024 8:05 PM

विविध पिकांचे दीड हजार पर्यावरणस्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील

विविध पिकांचे दीड हजार पर्यावरण स्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा १०९ वाणांचं लोकार्पण लौकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या ५ वर्षात देशभरात शंभर फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरता १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं ते म्हणाले. शेती फायद्याची करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे असं सांगून,...