July 1, 2024 8:06 PM

३ नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारे हे कायदे संसदेने मागच्या वर्षी संमत केले होते. हे तीन नवे कायदे लागू करण्यापूर्वी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांशी केंद्र सरकारनं अनेकदा चर्चा केली आहे. त्यामुळे देशभरातली राज्य सरकारं हे कायदे अंमलात आणण्यासाठी सज्ज आहेत. या फौजदारी कायद्यांचा उद्देश शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामु...

June 19, 2024 4:24 PM

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

राज्यभरात विविध ठिकाणी आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५९ रिक्त पदांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी एकूण ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची मैदानी चाचणी १९ ते २७ जून दरम्यान पालघर मध्ये होणार आहे.   वाशिम जिल्ह्यातही पोलिस दलातल्या ६८ रिक्त जागांसाठी आज सकाळपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या जागांसाठी चार हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया पुढील तीन दिवस चालणार आहे.     बुलडाणा जिल्हा पोलिस दला...