September 12, 2024 8:16 PM
मध्य प्रदेशात भिंत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातल्या दतिया जिल्ह्यात आज सतत होणाऱ्या पावसामुळं भिंत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात आलं आहे. खालकापुरा परिसरात राजगड किल्ल्याची ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्यानं ही दुर्घटना झाली. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृताच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रूपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.