September 13, 2024 9:01 AM
जायकवाडी धरणाच्या विसर्गात कपात
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणाचा पाणीसाठी साडे ९८ टक्क्यांवर गेल्यानं तसंच पाण्याची आवक सुरू असल्यानं, धरणाच्या १८ दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरणाच्या सहा दरवाजातून सुमारे तीन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात धनेगाव इथलं मांजरा धरण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरलं आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जास्त झाल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीमध्ये पाणी स...