September 13, 2024 9:01 AM

जायकवाडी धरणाच्या विसर्गात कपात

पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणाचा पाणीसाठी साडे ९८ टक्क्यांवर गेल्यानं तसंच पाण्याची आवक सुरू असल्यानं, धरणाच्या १८ दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरणाच्या सहा दरवाजातून सुमारे तीन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात धनेगाव इथलं मांजरा धरण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरलं आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जास्त झाल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीमध्ये पाणी स...

September 10, 2024 3:26 PM

जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे पुन्हा उघडले, पाणीपातळीत वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १५ हजार ४६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यावर विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.    भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून व...

September 10, 2024 9:13 AM

पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १२ दरवाजातून ६ हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू

  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १२ हजार ७४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.  

August 27, 2024 10:29 AM

जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. येत्या दोन दिवसात, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.