September 23, 2024 12:53 PM

केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी मुंबईहून भारत गौरव ट्रेन

केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी भारतीय रेल्वे भारत गौरव रेल्वे गाडी सुरू करणार आहे. आयआरसीटीसी आणि उत्तराखंड राज्य पर्यटन महामंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार. ही अकरा दिवसांची यात्रा असून, त्यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रिनाथ या तीर्थक्षेत्रांचा समावेश असेल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून तीन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता ही यात्रा सुरू होईल आणि त्याच स्थानकावर १३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता परत येईल. प्रवाशांना कल्याण, पुण...

September 5, 2024 7:00 PM

मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित

भारतीय रेल्वेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल म्हणून लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याच्या रेल्वे विकास मंडळाच्या वचनबद्धतेचं हे द्योतक आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात  आलं आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि कौशल्यवृद्धी होऊन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकारण्यात मोठा हातभा...

September 2, 2024 6:54 PM

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. महाराष्ट्रतले २ आणि मध्यप्रदेशातले ४ जिल्हे यातून जोडले जाणार आहे. या मार्गावर ३० रेल्वे स्थानकं असतील, यामुळं १ हजार गावांना आणि ३० लाख नागरिकांना याचा ...

August 9, 2024 3:54 PM

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

July 5, 2024 7:49 PM

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी ते बोलत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गाला सोयी देणे याकडे सरकारचा कल आहे, असं सांगत गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी याच उद्देशाने दोन अमृतभारत गाड्यांना हिरवा झ...

July 4, 2024 8:45 PM

भारतीय रेल्वेची १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना

भारतीय रेल्वेनं पुढच्या दोन वर्षांसाठी सुमारे १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना आखली आहे. त्यात ५३०० पेक्षा जास्त सामान्य डबे असतील, असं अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत सांगितलं. रेल्वेचे प्रवासी वाढत असून त्यामुळे डब्यांची आवश्यकताही वाढली आहे. त्यामुळे डब्यांचे उत्पादनही वाढवत असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

June 21, 2024 1:20 PM

जगातील सर्वात उंच चिनाब पुलावर ८ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वेनं काल जम्मू काश्मिरमधल्या जगातील सर्वात उंचीवरच्या चिनाब पुलावर आठ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे जम्मू काश्मिरमधील राईसी ते बारामुल्ला दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामबान जिल्ह्यातल्या संगलदान पासून ते रईसी दरम्यान ४६ किलोमिटर विद्युतीकरण झालेल्या मार्गावर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. या मार्गावरुन ४० किलोमिटर प्रतीतास वेगानं गाडी चालवण्यात आली. या पुलावरुन पहिल्यांदाच पूर्ण रेल्वेगाडी चालवण...

June 16, 2024 3:33 PM

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागासाठी ही नोंद झाली आहे. रेल्वेने गेल्या २६ फेब्रुवारीला विविध दोन हजार ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यात ४० लाख १९ हजार लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, रेल्वे पादचारी पुलांचं उद्घाटन तसंच नव्या रेल्वेस्थानकांची पायाभरणी करण्यात आली होती.