August 31, 2024 2:13 PM

भारतातील UPI ने जगातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला मागे टाकले

भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून या वर्षीच्या एप्रिल ते जुलै मध्ये एक्याऐंशी लाख कोटी रुपयांची देवघेव झाली. जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये वार्षिक ३७ टक्के वाढ होत आहे. ग्लोबल पेमेन्ट हब पेसिक्युअरने दिलेल्या माहितीनुसार भारतात या माध्यमातून दर सेकंदाला ३ हजार ७२९ व्यवहार होतात.  

August 30, 2024 2:34 PM

सीमा भागात शांतता राखण्याबद्दल भारत आणि चीनदरम्यान सहमती

सीमा भागात शांतता राखण्याबद्दल भारत आणि चीनदरम्यान सहमती झाली आहे. भारत-चीन सीमा प्रश्नविषयक सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत संयुक्त यंत्रणेची ३१वी बैठक काल चीनमध्ये बीजिंग इथं पार पडली. या बैठकीत यावर सहमती झाली. सीमा भागात शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर राखणं, ही बाब दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्यासाठीचा आधारभूत मुद्दा असल्याचा पुनरुच्चारही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी केला.   बैठकीत भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे, पूर...

August 28, 2024 9:46 AM

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – मंत्री अश्विनी वैष्णव

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 7 टक्के दराच्या आधारे बोलत होते. या अहवालानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 5 टक्के, अमेरिकेचा अंदाजे 2 पूर्णांक 6 टक्के इतका आहे. तर जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये इंडोनेशिया, तुर्की, रशिया, पोलंड, स्पेन आणि मेक्सिको या देशांचा स...

August 26, 2024 9:12 PM

दुसऱ्या भारत-सिंगापूर गोलमेज परिषदेत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा

दुसरी भारत-सिंगापूर गोलमेज परिषद आज सिंगापूर इथं झाली. भविष्यात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांंच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. डिजिटायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत विकास, आरोग्य आणि औषधी या क्षेत्रांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल या परिषदेला उपस्थित होते.  भारत आणि सिंगापूर यांच्या राजनैतिक संबंधाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त ...

August 26, 2024 1:05 PM

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. वीईरा यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझील यांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना मिळेल, असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मौरो वीईरा उद्या होणाऱ्या नवव्या भारत-ब्राझील कमिशनच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संयुक्तपणे भुषवतील.  यावर्षीचं जी २० चं अध्यक्षस्थान ब्राझीलकडे आहे, या परिषदेतून चांगले परिणाम उपजावेत यासाठी दोन्ही देश चर्चा...

August 23, 2024 8:08 PM

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त सैनिकी सराव ‘मित्र शक्ती’चा समारोप

भारत आणि श्रीलंका सैन्यदलांमधला दहावा संयुक्त  सैनिकी सराव  नुकताच पार पडला. श्रीलंकेतल्या मदुरू ओया इथल्या संरक्षण प्रशिक्षण शाळेत पार पडलेल्या या सरावसत्राला “मित्र शक्ती” असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंधारा तेन्नाकुन यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झा यांनी यात सहभागी झालेल्या राजपुताना रायफल्सच्या १०६ भारतीय जवानांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या गजबा रेजिमेंटने या सराव सत्रात भाग घेतला. श्रीलंका ...

August 23, 2024 1:12 PM

भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढच्यावर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने लीड्स, बर्मिंहम,लंडन, आणि मॅनचेस्टर इथं खेळले जाणार आहेत.    भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कार्यक्रमाचीही घोषणा झाली आहे. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ पुढच्या वर्षी म्हणजे जून आणि जुलै २०२५ मध्ये इंग्लंडमध्ये पाच टी-ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आ...

August 22, 2024 10:32 AM

ग्राहकोपयोगी गतिमान वस्तूंच्या क्षेत्रात आशिया-प्रशांत प्रदेशात भारत आघाडीवर

जलद गतीनं विक्री होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात भारत सातत्यानं दोन अंकी वाढीसह आशिया-प्रशांत प्रदेशात आघाडीवर आहे, असं नेल्सनआयक्यु या सर्वेक्षण संस्थेनं काल जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार शहरांमध्ये वास्तव्यास असलेले 41 टक्के भारतीय नागरिक उत्पादनांची माहिती ऑनलाइन पाहतात मात्र प्रत्यक्ष खरेदी ही दुकानातूनच करतात. सणासुदीच्या काळात विशेष सवलती असल्यानं तंत्रज्ञानाधारीत उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून चलनवाढ असूनही बाजारपेठेतली स्पर्धा वाढत आहे,असंही या अ...

August 21, 2024 9:53 AM

नेपाळमधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताची परवानगी

नेपाळमधून १२ जल विद्युत प्रकल्पामधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. नेपाळकडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता भारताकडून करण्यात येणाऱ्या वीज आयंतीत वाढ झाली असून, नेपाळमधील २८ प्रकल्पातून ९४१ मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीच नेपाळ वीज निर्यात करणारा महत्वाचा देश बनला असून, मागील आर्थिक वर्षात नेपाळणने सुमारे १४ अब्ज डॉलर्सची वीज निर्यात केली आहे.

August 20, 2024 1:21 PM

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, डिजिटल अर्थव्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करू शकतात असं गोयल यांनी म्हटलं आहे. तेल आणि वायू उद्योगात भारत प्रगती करत असून मलेशियन कंपन्यांना यात अनेक...