July 15, 2024 11:42 AM

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार, कोकणात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या बहुतांश भागात कालही पावसाची संततधार सुरू होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी आणि विन्हेरे या स्थानकांदरम्यान काल दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणार्‍या तेजस एक्सप्रेस,जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रत्नागिरी स्थानकात सायंकाळी पावणेसहापासून थांबवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शाळा-महाविद्...

July 8, 2024 6:43 PM

मुंबईत गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस

मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली. सांताक्रुझ वेधशाळेत नोंद झालेला गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार आज सकाळी साडे ८ पर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २६७ मिलिमीटर पाऊस झाला. यापूर्वी २ जुलै २०१९ रोजी ३७५ आणि १५ जुलै २००९ रोजी २७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी मध्यरात्री १ ते सकाळी ७ दरम्यान सुम...

July 8, 2024 12:46 PM

पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त जलपंप उपलब्ध – मंत्री दीपक केसरकर

मुंबई शहरात सध्या फक्त कुर्ला आणि शीव या भागात पाणी साठलेलं असून  त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी काय पावलं सरकार उचलत आहे, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्यानंतर ते बोलत होते.    मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व श...

July 8, 2024 12:38 PM

मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई आणि उपनगरात साचलेलं पाणी उपसा करण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टचे आदेश दिले आहेत. मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावं आणि यंत्रणांना सहकार्य कराव असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.     मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कालपासून हजेरी लावली आहे.  मुंबई मध्ये काल रात्री १ वाजल्यापासून आज सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मुंबईच्या सखल ...

July 8, 2024 11:00 AM

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 4-5 दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज, आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये उद्या तर; आज आणि उद्या बिहारमध्ये; मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने, मध्य ...

July 8, 2024 1:36 PM

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.   मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात र...

July 7, 2024 3:04 PM

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी

राज्याच्या बहुतांश भागात पावसानं काल आणि आज हजेरी लावली आहे. नवी मुंबईत पावसामुळं रबाळे एमआयडीसी भागात डोंगरावरचे मोठे दगड खाली कोसळले आहेत. या भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं प्रत्येकी एक पथक ठाणे, कुर्ला, घाटकोपर आणि पालघर इथं, तर तीन पथकं अंधेरीत तैनात करण्यात आली आहेत. ठाण्यातलं पथक शहापूर भागात मदत आणि बचावकार्यात गुंतलं आहे.    नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून जोरदार पावसानं ह...

July 6, 2024 11:34 AM

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वीज पडून 19 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले आहेत. पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या आणि झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.   राज्याच्या उत्तर, आग्नेय आणि दक्षिण मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढील 24 तासांसाठी पिवळा बावटा जारी केला आहे.

July 2, 2024 1:13 PM

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा  अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

June 27, 2024 11:49 AM

येत्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे