September 2, 2024 7:18 PM
आंध्रप्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूरस्थिती
देशाच्या विविध भागात पावसाचा जोर असून ठिकठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले आहेत. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झालं असून ,सोयाबीन कापूस पिकात पाणी साचल्याने नुकसान झालं आहे. परभणी - जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सेलू इथं पूरस्थिती निर्माण झाली असून उपआयुक्तांनी लष्कराला मदतीसाठी पाचारण केलं आहे. ६० सैनि...