September 1, 2024 3:06 PM

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं.

August 30, 2024 7:09 PM

प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या बंदराची निर्मिती करताना सर्वांचं हित ध्यानात ठेवू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं.    वाढवण बंदरामुळे आर्थिक क्षेत्रात मुंबईचं आघाडीचं स्थान कायम राहील, यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील, असं उपमुख...

August 29, 2024 8:19 PM

‘महाराष्ट्र’ जीडीपीत सर्वाधिक वाटा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा सर्वाधिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. आपलं सरकार रात्रंदिवस काम करत असून घरात बसून सरकार चालवता नाही येत, त्यासाठी जनतेशी संपर्कात राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. राज्याची एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपलं सरकार उपाययोजना करतं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

August 29, 2024 7:14 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधण्यासाठी तसंच एकूणच या घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत बांधकाम अभियंते, आयआयटी मुंबईचे प्रतिनिधी, तसंच नौदलाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. याखेरीज राजकोटमधेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यासाठी देशातले नामवंत शिल्पकार, अभियंते, तज्ञ आणि नौदलाचे प्रतिनिधी यांची तज्ञ समिती ...

August 28, 2024 9:13 AM

‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'लाडक्या बहिणी' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

August 24, 2024 7:13 PM

शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढच्या महिन्यात अर्ज सादर करणाऱ्यांनाही ३ महिन्याचे पैसे देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या योजनेमुळे चांद्यापासून बांद...

August 23, 2024 7:03 PM

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र, त्यावर होत असलेलं राजकारण त्याही पेक्षा दुर्दैवी आहे.  नेपाळमधल्या बस दुर्घटनेत जळगावमधल्या नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये आमदार आणि अधिकारी पाठवून तातड...

August 23, 2024 6:56 PM

लाडकी बहीण योजनेसह सुरक्षित बहीण योजनाही राबवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहिण योजनाही राबवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमधे  महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबीरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट महिन्याची मुदत संपल्यानंतरही सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या बहिणींना देखील आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या...

August 22, 2024 3:02 PM

५ वर्षांत मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री

मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी, अर्थात स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षांत दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगानं लक्ष केंद्रित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी निती आयोगानं केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  निती आयोगानं केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचं उद्दिष्ट...

August 21, 2024 5:54 PM

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे भूमिपूजन

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंद यांनी या वेळी केलं. परदेशी नागरिकांसाठीही हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन १०० कोटी रुपयांच्या या टर्मिनलचं भूमिपूजन आज संपन्न झाल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे ...