June 29, 2024 6:35 PM

मुंबईत फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” विषयावर परिषद

“भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय साक्ष अधिनियम, 2023”, आणि “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023” हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून  देशभर लागू होणार आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी केंद्रीय विधी आणि  न्याय मंत्रालयानं उद्या मुंबईतल्या वरळी इथल्या एनएससीआय सभागृह इथं “ फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” या विषयावर परिषदेचं  आयोजन केलं  आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कायदा आणि  न्याय राज्...

June 19, 2024 2:33 PM

टपाल कचेरी कायदा, २०२३ कालपासून अंमलात

टपाल कचेरी कायदा, २०२३ कालपासून अधिकृतरीत्या अंमलात आला आहे. तो आता १८९८ च्या भारतीय टपाल कचेरी कायद्याची जागा घेणार आहे. देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा तसं ठोस कारण असल्यास टपालामार्फत पोहोचवण्यात येणारी पार्सल वाटेतच रोखण्याचा अधिकार टपालखात्याला देण्याची तरतूद या नव्या कायद्यात करण्यात आली आहे.   या कायद्यानुसार कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास शांततेच्यादृष्टीनं त्यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो. अ...