August 27, 2024 7:16 PM

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. ...

August 6, 2024 4:05 PM

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या यावेळेपेक्षा दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या २४ जलाशयात मिळून ६१ पूर्णांक ६२ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या पालखेड धरणात ६६ टक्के आणि दारणा धरण समुहात ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे. गिरणा धरणातही ७३ टक्के इतका पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जलसंपदा विभागानं पाण्याचा विसर्ग कमी केला असून सध्या गंगापूरमधून ४७० तर दारणा धरणातून ५ हजार ३५६ आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून...