July 11, 2024 3:08 PM
बी. आय. टी. चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक – उदय सामंत
मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्यानं तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र विधानपरिषदेत दिली. या चाळीत अद्याप काही लोक राहत असून त्यांचं पुनर्वसन झाल्यावर स्मारकाचं काम पुढे नेण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. इंदू मिल परिसरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता उर्वरित काम...