August 10, 2024 7:37 PM

अजिंठा लेणी रेल्वे जोडणी हा प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारा प्रकल्प असल्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती

अजिंठा लेणी रेल्वे जोडणी हा प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारा हा प्रकल्प असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत जालना ते जळगाव असा १७४ किलोमीटर लांबीचां रेल्वेमार्ग विकसित केला जाईल. या मार्गामुळे दोन्ही जिल्ह्यातलं प्रवासाचं अंतर ५० टक्क्याने कमी होईल असं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी ९३५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून पुढच्या चार ते पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणं...

August 10, 2024 9:55 AM

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला आणि स्वच्छ वनस्पती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला तसंच ग्रामीण भागात 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षातील अंमलबजावणीलाही मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवी घरं बांधण्यात येणार असून, त्यापैकी दोन कोटी घरं ग्रामीण भागात बांधली जातील, तर एक कोटी घरं शहरी भागात बांधली जातील. या योजनेसाठी तीन लाख साठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, असंही त्यांनी ...

June 18, 2024 9:11 AM

दार्जिलिंगमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सायंकाळी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडे जाणाऱ्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सकाळी झालेल्या या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.राष्ट्रपती द...