प्रादेशिक बातम्या

July 11, 2024 7:45 PM

शहीद कामेश कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना शहीद झालेले कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी नांदेडमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी  सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने शहीद कामेश कदम यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली, तर तहसीलदारांनी राज्यशासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं.

July 11, 2024 7:41 PM

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाची  दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात झालेली  तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असं समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितलं. राज्यभरातल्या विविध शेतकरी संघटन...

July 11, 2024 7:38 PM

प्रधानमंत्र्यांचे हस्ते १३ जुलैला गोरेगाव-मुलुंड मार्गातील बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या जुळा बोगदा कामाचं भूमिपूजन १३ जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. १२ पूर्णांक २० शतांश किलोमीटर लांबीचा गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा मुंबईच्या पूर्व ...

July 11, 2024 7:33 PM

समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भ्रष्टाचारामुळे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या आहेत,  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विधीमंडळ परिसरात आज  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असून सुद्धा  मराठा आणि धनगर आरक्षणा...

July 11, 2024 7:20 PM

अंगणवाडी उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात प्रस्ताव – मंत्री आदिती तटकरे

राज्यात अंगणवाडी उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जि...

July 11, 2024 7:03 PM

संसदेत आणि विधिमंडळात सर्वपक्षियांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

संसदेत आणि विधीमंडळात सर्व पक्षीयांमध्ये संवादाची गरज आहे. सर्वांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संवाद ठेवावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते आज मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या सदस्यांना संबोधित करत होते. सर्वांनी आत्मपरीक्षण करावं, सत्ताधारी आणि विरोधक एकत्र ...

July 11, 2024 7:07 PM

सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती  देऊन  त्यांचं  थकित वीजबिल माफ करावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्...

July 11, 2024 4:27 PM

क्रीडा पत्रकारितेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुहास जोशी, खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंग असोसिएशननं नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. विलास दळवी यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विज...

July 11, 2024 4:23 PM

राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं – आमदार अबू आझमी

राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं, अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी आज विधानसभेत केली. यावर संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळं मुस्लिमांमधल्या मागास जातींना आरक्षण दिली असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.   छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली...

July 11, 2024 4:20 PM

१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राज्यात राबवणार – तानाजी सावंत

देशाला २०२५ सालापर्यंत क्षयमुक्त करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राज्यात राबवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. २०२२ साली राज्यात २ लाख ३३ हजार ८७२ ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.